शिक्षण आणि विकास
शिक्षण आणि विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. शिक्षणामुळे विकास होण्यासाठी मदत होते तसेच विकास झालेल्या ठिकाणी शिक्षणाला अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते.
जिथे निरक्षरता जास्त, तिथे बदलासाठी लोकांची मानसिकता तयार झालेली नसते. त्यामुळे नवीन माहिती लोकांना मिळत नाही.लोकांमध्ये नव्या जाणिवा निर्माण होत नाहीत.विचार पारंपारिक राहतात. संपूर्ण मानवी जीवन मागासलेले राहते.आर्थिक दुरवस्था, जुनाट विचारसरणी यामुळे मनुष्यबळाचा विकास खुंटतो.अशा ठिकाणी मुले, युवक,प्रौढ यांच्यासाठी शिक्षणाचे विविध उपक्रम घेतले तर तेथे विकासप्रक्रिया सुरु होते. आपण मागास का आहोत हे लोकांना समजायला लागते.बाहेरच्या जगाची ओळख होते.नव्या प्रेरणा मिळतात.एकत्र येऊन आपण आपले जग बदलू शकतो असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण होतो.त्यातून कृतीला चालना मिळते आणि विकासाला सुरवात होते. या अर्थाने शिक्षण हे विकासाचे कारण ठरते.
दुसरीकडे असेही दिसते की विकसित भागामध्ये लोकांना नवीन गोष्टी समजून घेण्याची हौस असते. त्यामुळे लोक सतत वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा ठिकाणी लोकांचे वेगवेगळे गट त्यांच्या गरजेनुसार शिक्षणाचे अनेक उपक्रम सुरु करतात. स्वतः होऊन पुढाकार घेतात.निधी जमा करतात.मदत मिळवतात.मुलांसाठी,युवकांसाठी,स्त्रियांसाठी,शेतकऱ्यांसाठी शिक्षणाची केंद्रे चालवतात.म्हणजेच विकासामुळे शैक्षणिक सोयी सुविधा झपाट्याने वाढायला मदत होते.अशा प्रकारे शिक्षण हे विकासाचे परिणाम ठरते.
या विवेचनावरून असे लक्षात येईल की शिक्षणाचा आणि विकासाचा फार जवळचा संबंध आहे.
जिथे निरक्षरता जास्त, तिथे बदलासाठी लोकांची मानसिकता तयार झालेली नसते. त्यामुळे नवीन माहिती लोकांना मिळत नाही.लोकांमध्ये नव्या जाणिवा निर्माण होत नाहीत.विचार पारंपारिक राहतात. संपूर्ण मानवी जीवन मागासलेले राहते.आर्थिक दुरवस्था, जुनाट विचारसरणी यामुळे मनुष्यबळाचा विकास खुंटतो.अशा ठिकाणी मुले, युवक,प्रौढ यांच्यासाठी शिक्षणाचे विविध उपक्रम घेतले तर तेथे विकासप्रक्रिया सुरु होते. आपण मागास का आहोत हे लोकांना समजायला लागते.बाहेरच्या जगाची ओळख होते.नव्या प्रेरणा मिळतात.एकत्र येऊन आपण आपले जग बदलू शकतो असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण होतो.त्यातून कृतीला चालना मिळते आणि विकासाला सुरवात होते. या अर्थाने शिक्षण हे विकासाचे कारण ठरते.
दुसरीकडे असेही दिसते की विकसित भागामध्ये लोकांना नवीन गोष्टी समजून घेण्याची हौस असते. त्यामुळे लोक सतत वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा ठिकाणी लोकांचे वेगवेगळे गट त्यांच्या गरजेनुसार शिक्षणाचे अनेक उपक्रम सुरु करतात. स्वतः होऊन पुढाकार घेतात.निधी जमा करतात.मदत मिळवतात.मुलांसाठी,युवकांसाठी,स्त्रियांसाठी,शेतकऱ्यांसाठी शिक्षणाची केंद्रे चालवतात.म्हणजेच विकासामुळे शैक्षणिक सोयी सुविधा झपाट्याने वाढायला मदत होते.अशा प्रकारे शिक्षण हे विकासाचे परिणाम ठरते.
या विवेचनावरून असे लक्षात येईल की शिक्षणाचा आणि विकासाचा फार जवळचा संबंध आहे.