सारासार विचार
माणसाला केवळ ज्ञान असून चालत नाही.ते ज्ञान कसे वापरायचे हे त्याला समजले पाहिजे.
मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा किंवा कौशल्याचा वापर चांगल्या तसेच वाईट प्रकारे करता येतो. तो वापर चांगल्या कामासाठीच केला पाहिजे.
ज्ञान हे एक साधन आहे. ते एक प्रभावी आणि परिणामकारक साधन आहे. म्हणूनच ते अतिशय जबाबदारीने वापरायला हवे.
ज्ञान आणि कौशल्य वापरताना केवळ बुद्धिवादी राहून चालत नाही. भावनेचाही विचार करावा लागतो. एकूण परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो. परिणामाची जबाबदारी घ्यावी लागते. यालाच सारासार विचार करणे असे म्हणतात.
सारासार विचार करणे हे एक वेगळेच महत्वाचे जीवनकौशल्य आहे.
त्याला साध्या भाषेत शहाणपणा असे म्हणतात.
त्याला साध्या भाषेत शहाणपणा असे म्हणतात.
म्हणूनच सगळी हुशार माणसे नेहमीच शहाणपणाने वागतात असे दिसत नाही.
तर अगदी निरक्षर माणसेही शहाणपणाने निर्णय घेतात असे आपल्याला अनेक वेळा दिसून येते ते यामुळेच !
तर अगदी निरक्षर माणसेही शहाणपणाने निर्णय घेतात असे आपल्याला अनेक वेळा दिसून येते ते यामुळेच !